
बामखेडा येथे पार पडला कोळी समाजाचा आदर्श विवाह
बामखेडा येथे पार पडला कोळी समाजाचा आदर्श विवाह
शिरपूर (तेज समाचार डेस्क): कोरोना महामारीमुळे लग्न समारंभावर यावर्षी खऱ्या अर्थाने विघ्न आणले. विषाणूचा सामूहिक प्रादुर्भाव होण्याची भीती पाहता लॉकडाऊन काळात लग्नसोहळ्यासारख्या सार्वजनिक समारोहवर बंदी घालण्यात आली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. परिस्थितीच तशी असल्याने पर्याय नव्हता. त्यामुळे अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला
शिरपूर शहारातील कोळी समाजाचे समाजसेवक कै,मगन(नाना) रतन कोळी(वाकडे) यांची व्दितीय सुकन्या चि,सौ,प्रतिभा मगन कोळी व नाशिक येथिल श्री संजय सुकलाल बागुल यांचे जेष्ठ चिरंजीव चि.सुमित संजय बागुल यांचा शुभ विवाह दि,१४/६/२०२० रोजी दु ११ वा शासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टसिंगचे पालन करत आदर्श असा विवाह सोहळा बामखेडा येथे पार पडला…
या विवाह सोहळ्यास भाजपा सोशल मीडिया शहरप्रमुख हिराभाऊ कोळी, पितांबर कोळी, रमेश कोळी,वसंत कोळी, दिपक कोळी,गणेश कोळी,सोनु कोळी व मित्र परिवार उपस्थित होते.