shirpur news

विद्यार्थ्यांना नातेसंबंध यांच्या जात प्रमाणपत्राचा आधारावर आरक्षण प्रवेश द्यावा : भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी

Featured धुळे
Share This:

विद्यार्थ्यांना नातेसंबंध यांच्या जात प्रमाणपत्राचा आधारावर आरक्षण प्रवेश द्यावा : भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी

मुख्यमंत्री ना. ठाकरे, शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांचाकडे मागणी
शिरपूर ( मनोज भावसार ) :  जुन महिना सुरु असल्याने विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाचे लागले आहेत. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकिय आणि प्रशासकिय यंत्रणा आरोग्य लढयामध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असे अनेक प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे सध्या शासकिय कार्यालयातुन मिळणे पुर्णपणे बंद झाले आहे. म्हणुन विद्यार्थ्यांना जात नातेसंबंध यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर आरक्षण प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकारे, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांचाकडे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि विद्यार्थ्यांच्या जात व उत्पन्नचा दाखला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
सदर दोन्ही कागदपत्रे उच्च शिक्षण प्रवेशासाठी व शुल्क सवलतीसाठी अनिवार्य असल्याने विद्यार्थी मे व जुन महिन्यात याबाबत शासनाला म्हणजेच तहसिल कार्यालयास अर्ज करुन मिळवत असतात. म्हणूनच किमान यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी जात प्रमाणपत्र बाबत वडिल, काका, अथवा भाऊ, बहिण किंवा थेट नातेसंबंध (डारेक्ट ब्लड रिलेटिव्ह) यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना जात आरक्षण प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांना (दि.१६ जुन) रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रातुन केली आहे. तसेच उत्पन्न दाखल्याबाबतही स्वघोषित सांक्षाकित तत्वाचा वापर करण्याची मुभा देणारे धोरण स्वीकारुन प्रवेश सुकर करावा व राज्यातील प्रत्येक जिल्हातील लाखो विद्यार्थी या दाखल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र सद्य स्थितीत दाखले मिळणे अशक्य झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवारच लटकली आहे महत्वाचे म्हणजे होतकरु विद्यार्थी उत्तम शिक्षणापासुन वंचित राहू नयेत हि काळजी घेणे आत्यावश्यक झाले आहे तरी याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे हि भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांचाकडे पाठवलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *