
देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले, केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून येत्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत होता. मात्र, त्यात आता 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलीय.
देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. रविवारी 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. या लॉकडाउन दरम्यान सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलेय.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी 14 एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर त्यात 3 मे पर्यंत यात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. आगामी 4 मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.